श्रीआसारामायण (मराठी)
गुरू ब्रम्ह दोन्ही
समसमान , हे ही उपमा किंचित न्यून ।
गुरूवाक्यें ब्रम्हा
ब्रम्हपण , तो सदगुरु पूर्ण अद्वयत्वे ॥
ब्रम्ह सर्वांचे प्रकाशक
, सदगुरू तयाचाही प्रकाशक ।
एवं गुरूहुनी अधिक , नाही आणिक पूज्यत्वें ॥
त्या सदगुरूचे देखिल्या पाये , तहान भूख तात्काळ जाये ।
कल्पना उठोचि न लाहे
, निजसुख आहे गुरूचरणी ॥
सदगुरू सर्वांग
सुंदरू , सकळ विद्यांचा आगरू ।
त्यासी माझा
नमस्कारू , साष्टांग भावे ॥
श्रीआसारामायण
गुरू चरण
रज शीष धरी , हृदय रूप विचार ।
श्रीआसारामायण वदे , वेदांताचा सार ॥
धर्म कामार्थ मोक्ष देई , रोग शोक संहार ।
भजे जो भक्तीभावाने , त्वरित होई बेडा पार ॥
भारतभूच्या सिंधुकिनारी
, नवाब जिल्ह्यात गाव बेराणी ।
राहत असे एक शेठ सदगुणी , नाव थाऊमल सिरूमलानी ॥
आज्ञेत राही पत्नी महेंगीबा , पतीपरायण नांव मंगीबा ।
चैत्र वद्य एकोणीसशे
अठ्ठ्याणवाला , आसुमल अवतरले षष्ठीला ॥
मातृमनी उसळे सुख सागर , द्वारी आला एक सौदागर ।
आणला एक अति सुंदर पाळणा , पाहूनी पिता मनी हर्षला ॥
सर्व चकीत ईश्वराची माया, योग्य वेळी कसा हा आला ।
ईश्वराची ही लीला न्यारी , बालक हा कोणी चमत्कारी ॥
संत सेवा आणि श्रुति श्रवण , माता पिता उपकारी ।
धर्म पुरुष जन्मला
कोणी , पुण्यांचे फळ भारी ॥
चेहरेपट्टी बाळाची सवाई , जन्मताच केली अशी नवलाई ।
समाजात होती मान्यता जैसी , प्रचलित एक लोकोक्ती ऐसी ॥
तीन बहिणींच्या पाठी जो येतो
. पुत्र तो त्रेखण म्हणवितो ।
निपजे अशुभ अमंगलकारी , दरिद्रता आणितो हा भारी ॥
उलट परिस्थिती दिसुनी आली , घरात जणू काही लक्ष्मी आली ।
इंद्रदेवाचे आसन डोलले , कुबेराने भांडार उघडले ।
मान-प्रतिष्ठा खूप वाढली , सकल मनी सुख-शांती आली ॥
तेजोमय बालक वाढला , आनंद झाला अपार ।
शील शांतीचे आत्मघन , करू लागले विस्तार ॥
एके दिनी त्यांच्या आली
द्वारी , कुलगुरू परशुरामाची स्वारी ।
जेव्हा त्यांनी बाळास पाहिले
, पाहूनी ते सहज बोलले ॥
हा नसे बालक साधारण, दैवी लक्षण तेज आहे कारण ।
नेत्रांमध्ये सात्विक लक्षण , याची कार्ये मोठी विलक्षण ॥
हा तर मोठा संत होईल, लोकांचा उद्धार करील ।
ऐकूनी गुरूची भविष्यवाणी , गदगद झाले सिरूमलानी ।
आईनेही कपाळ चुंबिले , प्रत्येकाने बाळास फिरविले ॥
ज्ञानी वैरागी पूर्वीचा , तुझ्या घरी अवतरला ।
जन्म घेतला योगीने , पुत्र तुझा म्हणविला ॥
पावन झाले कुळ तुझे , जननी कूस कृतार्थ ।
नांव अमर झाले तुझे , पूर्ण चार पुरुषार्थ ॥
सत्तेचळिस साली देश विभाजन , सिंधमध्ये सोडले भू-पशू व धन ।
भारतात अहमदाबादला आले, मणिनगरला शिक्षण घेतले ॥
अति विलक्षण स्मरणशक्ती , आसुमलची त्वरित युक्ती ।
तीव्र बुद्धी एकाग्र नम्रता , त्वरित कार्य अन सहनशीलता ॥
आसुमल प्रसन्नमुख राहती , शिक्षक हसमुखभाई म्हणती ।
पिस्ता बदाम काजू अखरोट , खिसे भरून खाती भरपोट ॥
देऊनी खाऊ लोणी खडीसाखरेचा , आईने शिकविले ध्यान व पूजा ।
ध्यानाचा स्वाद लागला तैसा , राहिना मासा पाण्याविण जैसा ॥
झाले ब्रम्हविद्येने युक्त
ते , तिच विद्या जी विमुक्त करीतसे ।
रात्रभर ते पाय चेपायचे , तृप्त पित्याचे आशिर्वाद घ्यायचे ॥
बाळा तुझे रे या
जगती , सदैव राहील नांव ।
लोकांचे तुझ्याकडून
सदा पूर्ण होईल काम ॥
पित्याचे छत्र हरपले
जेव्हा , टाकले मायेने जाळे तेव्हा ।
मोठ्या भावाचे झाले दुःशासन , व्यर्थ्य झाले आईचे आश्वासन
॥
सुटले वैभव शाळा शिक्षण , सुरु झाले मग अग्नी परिक्षण ।
सिध्दपुरला ते नोकरीस गेले , कृष्णापुढे अश्रू ढाळले ॥
सेवक सखा भावाने भिजले, गोविंद माधव तेव्हा रिझले ।
एके दिनी एक बाई आली , म्हणाली हे भगवान सुखदाई ॥
पुत्र तुरूंगात बहु मी
दुखावले , खून खटल्यात दोन फसली मुले ।
म्हणे आसुमल सुखी राहतील , निर्दोष सुटून लवकर येतील ।
मुले घरी आली आई निघाली , आसुमलच्या पाया पडली ॥
आसुमलचा पुष्ट झाला , अलौकिक प्रभाव ।
वाकसिध्दिच्या शक्तीचा
, झाला प्रादुर्भाव ॥
वर्ष सिद्धपुरी काढली
तीन , अहमदाबादला आले परतून ।
करू लागली लक्ष्मी नर्तन , केले भावाचे मन परिवर्तन ॥
दारिद्र्याला दूर सारले , वैभवाने घर भरुन दिले ।
सिनेमा त्यांना कधी न आवडे , जबरीने नेले नी रडत आले ॥
ज्या आईने ध्यान शिकविले , तिलाच आता रडू कोसळले ।
आईची इच्छा करावे लग्न , आसुमलचे वैरागी मन ॥
तरीही सर्वांनी आग्रह केला , वाङनिश्चय जबरीने केला ।
लग्नास तयार झाले सर्वजण , आसुमलने केले पलायन ॥
पंडीत म्हणे गुरू
समर्थांना , रामदास सावधान ।
सप्तपदी फिरतांना , पळाले वाचवून प्राण ॥
शोध घेऊनी सर्वच
थकले , अशोक आश्रमात भडोचला मिळाले ।
मार्ग मिळाला मुश्किलीने , अब्रूची आण दिली भावाने ॥
युक्ती प्रयुक्तीने घरी आणले
, वरात घेऊन आदिपुरला गेले ।
लग्न झाले पण घट्ट मन केले , भक्ताने पत्नीला समजाविले ॥
आपले वागणे राहील ऐसे , पाण्यात कमळ राहते जैसे ।
सांसारीक व्यवहार तेव्हा
होईल , जेव्हा मला साक्षात्कार होईल ।
सोबत राही जसे आत्मा काया , सोबत राहिले वैरागी माया ॥
अनश्वर मी जाणतो , सतचित हो आनंद ।
स्थितीत जगू लागता , होई परमानन्द ॥
मूळ ग्रंथ अभ्यासा
हेतू , संस्कृत भाषा आहे एक सेतू ।
संस्कृत भाषा शिकून घेतली , गती आणि साधना वाढविली ॥
एक श्लोकास हृदयात ठसविले , निद्रीत वैराग्य जागे झाले ।
आशा सोडून नैराश्य अवलंबिले , अनुष्ठान त्यांनी आरंभिले ॥
लक्ष्मी देवीस समजाविले , ईश्वर प्राप्ती ध्येय सांगितले ।
घर सोडून निघून जाईन , ध्येय मिळवूनी परत येईन ॥
केदारनाथाचे दर्शन घेतले , लखोपतीभव आशिष घेतले ।
मनोभवे पुन्हा संकल्प केला , ईश प्राप्तीचा आशिष घेतला ॥
आले कृष्णाच्या लीलास्थळीत , वृंदावनीच्या कुंज गलीत ।
कृष्णाने मनात असे प्रेरिले , नैनीतालच्या ते वनात गेले ॥
तेथे श्रोत्रिय
ब्रम्हनिष्ठित , स्वामी लीलाशाह प्रतिष्ठित ।
आत मृदू अन बाहेर कठोर , निर्विकल्प जणू कागद कोरा ।
पूर्ण स्वतंत्र परम उपकारी , ब्रम्हस्थित आत्मसाक्षात्कारी ॥
ईश कृपेविण गुरू
नाही , गुरूविण नाही ज्ञान ।
ज्ञानविण आत्मा नाही
, गाती वेद पुराण ॥
जाणण्यास साधकाची
कोटी , सत्तर दिवस झाली कसोटी ।
अग्नीत सोने तप्त बनवीले , गुरूंनी आसुमल बोलाविले ॥
म्हणे गृहस्थ होऊन कर्म करा , ध्यान भजन ही घरीच करा ।
आज्ञा पाळुन घरी आले , पक्षात मोटी कोरलला गेले ॥
नर्मदेकाठी ध्यानास बसले , लालजी महाराज आकर्षिले ।
प्रेमळ स्वामी तेथे आले , दत्तकुटीमध्ये साग्रह नेले ॥
भरते आले प्रभु प्रेमाचे , अनुष्ठान चाळीस दिवसांचे ।
मेले षडरिपु स्थिति मिळाली , ब्रम्हनिष्ठता सहज लाभली ॥
शुभाशुभ सम रुदन गायन , ग्रिष्म थंडी अन मानापमान ।
सदा तृप्ती काय भूक पिपासा, महाल झोपडी आशानिराशा ।
भक्तीयोग ज्ञान अभ्यासी , झाले समान मगहर अन काशी ॥
भावच कारण ईश्वरास , न स्वर्ण काष्ठ पाषाण ।
सत चित आनंदरूप आहे , व्यापक रे भगवान ॥
ब्रम्हेशान जनार्दन , शारदा शेष गणेश ।
निराकार साकार रे , आहे सर्वत्र भवेश ॥
झाले आसुमल
ब्रम्हाभ्यासी , जन्म अनेक आले फळासी ।
दूर पळाली आधी-व्याधी , सिद्ध जाहली सहज समाधी ॥
एके रात्री नदीकाठी मन
आकर्षले , सुटले वादळ मेघ वर्षले ।
बंद घराची ओसरी पाहिली , बसले तिथेच समाधी लावली ॥
पाहिले कुणीतरी वाटले डाकू , आणल्या काठ्या भाले चाकू ।
पळापळ-गोंधळ करू लागले , तुटली समाधी ध्यान भंगले ॥
साधक उठला होते विखुरले केस , क्रोधाचा नव्हता लवलेश ।
सरळ लोकांनी साधू मानले , हत्यार्यांनी काळच जाणले ॥
भैरव पाहुन दुष्ट घाबरले , पहिलवानांना मल्लच दिसले ।
कामी लोकांनी प्रियकर मानले, साधूजनांनी वंदन केले ॥
समद्रुष्टीने पाही सर्वांना , चालही शांत गंभीर ।
सशस्र गर्दीला सहज चिरुन गेले पीर ॥
आई आली धर्मात्मा देवी , बरोबर पत्नी लक्ष्मी देवी ।
दोघींनाही रडू कोसळले , करूणेनेही अश्रू ढाळले ॥
संत लालजींचे हृदय द्रवले , दर्शकही अश्रूंमध्ये भिजले ।
सर्व म्हणाले तुम्ही घरी जा, म्हणे आसुमल तुम्ही ऐका ॥
चाळीस दिवस झाले नाही पूर्ण , अनुष्ठान आहे माझे अपूर्ण ।
आसुमलने सोडली तितिक्षा , आई व पत्नीने केली प्रतीक्षा ॥
ज्या दिवशी गाव त्यांनी सोडले , गांवचे नर-नारी खूप रडले ।
अहमदाबादला केले प्रयाण , मियागावातून केले पलायन ॥
मुंबईला गेले गुरुंची चाह , भेटले तेथे लीलाशाह ।
परमपित्याने पुत्रास पहिले , सुर्याने घटजलात पाहिले ॥
घडा तोडून जल जलात मिळविले , जलप्रकाशाने आकाश उजळले ।
निज स्वरूपाचे ज्ञान दृढावले , अडीच दिवस समाधीत रंगले ॥
आश्विन शुध्द द्वितीया , संवत वीसशे एकवीस ।
मध्यान्ही अडीच वाजता , भेटला ईशला ईश ॥
देह सर्व मिथ्या झाला , जगत झाले निस्सार ।
झाला आत्म्याशी तेव्हा , आपला साक्षात्कार ॥
परम स्वतंत्र पुरुष प्रगटला , जीवत्व जाऊन शिवत्वी मिळाला ।
जाणले आहे मी शांत निरंजन , मला न लागू कुठले बंधन ॥
हे जगत आहे सारे नश्वर , मीच आहे शाश्वत एक अनश्वर ।
नेत्र दोन परि दृष्टी एक आहे , लघु गुरु मध्ये तोच एक आहे ॥
सर्वत्र एक कुणाला सांगावे , सर्व व्याप्त कुठे यावे जावे ।
अनंत शक्तीपुंज अविनाशी , रिध्दी सिध्दी त्याच्या दासी ॥
साराच ब्रम्हांड पसारा , चाले त्याच्या इच्छानुसारा ।
जर तो स्वत: संकल्प चाल्वी , मृत कायाही जीवंत होई ॥
ब्राम्ही स्थिती प्राप्त होता , कार्य न राही शेष ।
मोह कधी ना फसवू शके , इच्छा नाही लवलेश ॥
पूर्ण मिळविली गुरुकृपा , पूर्ण गुरुचे ज्ञान ।
आसुमलातून प्रगटले , सांई आसाराम ॥
जागृत स्वप्नी सुषुप्ती चेती , ब्रम्हानंदाचा घेती ।
खाता पीता मौन वा बोलता , ब्रम्हानंद मस्तीत राहता ॥
रहा घरीच गुरुंचा हा आदेश , गृहस्थ साधू करा उपदेश ।
गुरुंनी आगळी किमया केली , गुजरात डीसा स्वारी आली ।
मृत गाईस जीवनदान दिले , तेव्हापासून लोकांनी ओळखले ॥
द्वारी म्हणती नारायण हरी , घेण्या जाती कधी माधुकरी ।
तेव्हा पासून ते सत्संग देती , सर्व आरतीने शांती मिळविती ॥
जो आला त्याचा उध्दार केला , बेडा पार भक्तांचा केला ।
कित्येक मरणासन्न वाचविले , व्यसन मांस अन मद्य सोडविले ॥
एके दिवशी मन उबगले , प्रयाण केले डीसाहून ।
आली लहर फकीराची , झोपडी दिली झुगारुन ॥
ते नारेश्वर धामी आले, नर्मदा नदीच्या काठी गेले ।
मंदिर मागे दूर टाकले , घनदाट जंगलामध्ये गेले ॥
एक वृक्षाखाली दगडावरती , बसूनी ध्यान निरंजन धरती ।
रात्र सरली सकाळ झाली , बाल सुर्याने छबी दाखवली ॥
पहाटे कोकीळेचे मंजूळ गायन , उठले संत सुटल्यावर ध्यान ।
प्रातर्विधी करून घेतला , तेव्हा आभास भुकेचा झाला ॥
विचार केला मी न जाणार कोठे , आता राहिन मी बसून येथे ।
ज्याला गरज असेल तो येईल , सृष्टीकर्ताच भोजन आणिल ॥
जसा त्यांच्या मनी आला विचार , दोन शेतकरी झाले हजर ।
फेटा दोघांच्या डोक्यावरती , खाद्यपेय दोन्ही हाती ॥
म्हणे सफल झाले जीवन आज , अर्घ्य स्विकारा महाराज ।
म्हणे संत दुसरीकडे जावे , असेल जो तुमचा त्याला द्यावे ॥
म्हणे शेतकरी आपण दिसला , स्वप्नात मार्ग रात्री पाहिला ।
आमुचा ना कोणी संत दुजा , चला गावी करू तुमची पूजा ॥
आसारामांनी मनी ठरविले , निराकार आधार आपुले ।
प्याले दूध थोडे फळ खाल्ले , नदीकिनारी योगी आले ॥
गांधीनगर गुजरातमध्ये आहे मोटेरा ग्राम ।
ब्रम्हनिष्ठ श्री संताचे , हेच आहे पावन धाम ॥
आत्मानंदात मग्न आहेत करती वेदांती खेळ ।
भक्ती योग अन ज्ञानाचा सदगुरू करती मेळ ॥
साधिकांचा आहे वेगळा , आश्रम नारी उत्थान ।
नारी शक्ती जागृत सदा , गाती सारे गुणगान ॥
बालक वृध्द आणि नरनारी , सर्व प्रेरणा मिळविती भारी ।
एकदा जरी कोणी दर्शन घेई , शांतीचा त्याला अनुभव येई ॥
नित्य विविध प्रयोग करविती , नादानुसंधान सांगती ।
नाभीतून ते ओम म्हणविती , हृदयातून ते राम म्हणविती ॥
सामान्य जे ध्यान करिती , त्यांना अंतर्यात्रा करविती ।
सकला निर्भय योग शिकविती , सर्वांचे आत्मोत्थान करविती ॥
हजारोंचे रोग मिटविती , अन लाखोंचे शोक मिटविती ।
अमृतमय प्रसाद जेव्हा देती , भक्तांचा रोग शोक ते हरती ॥
ज्यांनी नामाचे दान घेतले , गुरू अमृतही प्राशन केले ।
त्यांचा योग क्षेम ते वाहती , ते न तीन तापांनी तपती ॥
धर्म कामार्थ मोक्ष मिळविती , रोग संकटातून ते वाचती ।
सर्व शिष्यांचे रक्षण करतात , सुक्ष्म देहाने सदगुरू येतात ॥
दयाळू आहेत सदगुरू खरोखर , सहज तारी सर्वांना बरोबर ।
ते इच्छिती गुरू-अमृत लुटावे , सर्वांनी आत्मज्ञान मिळवावे ॥
एकशे आठ जे पाठ करतील , त्यांची सर्वही कामे होतील ।
काशीकर नावाचा दास , पुर्ण होईल सर्व आस ॥
वराभयदाता सदगुरू ,परमही भक्त कृपाळू ।
निश्चल प्रेमाने जो भजे , सांई करती निहाल ॥
मनात तुमचे नाम राहो , मुखी राहो सुगीत ।
आम्हांस इतके द्या तुम्ही , चरणी राहू द्या प्रीत ॥
श्रीगुरू-महिमा
गुरूविना ज्ञान न उपजे , गुरू विना मिटे न भेद ।
गुरू विना संशय न मिटे , जय जय जय गुरूदेव ॥
तीर्थाटनाचे एक फळ , संत भेटी फळ चार ।
सदगुरू भेटी अनंत फळ , म्हणे कबीर विचार ॥
भव भ्रमण संसार दु:ख , त्याचा अंत ना आदी ।
निर्लोभी सदगुरू विना कोण तारे भव व्याधी ॥
पूर्ण सदगुरू सेविता , अंतर प्रगटे आप ।
मनसा वाचा कर्मणा , मिटती जन्मांचे ताप ॥
समदृष्टी सदगुरूने केली , मिटला भ्रमाचा विकार ।
जेथे पाहो तेथे एकच , प्रभुचा साक्षात्कार ॥
आत्मभ्रांती सम रोग नाही , सदगुरू वैद्य सुजाण ।
गुरू आज्ञेसम पथ्य नाही , औषध विचार ध्यान ॥
सदगुरू पदी समाविष्ट आहेत , अरिहंतादी पद सर्व ।
अशा सदगुरू श्रीचरणी , त्यजूनी उपासा गर्व ॥
दिव्य दृष्टी विना मिळत नाही , परमात्म्याची साथ ।
सेवे सदगुरूचे चरण , तो पावे साक्षात ॥
जे स्वरूप जाणल्याविना दु:ख पावलो अनंत ।
समजाविणार्या सदगुरूंना , वंदन करू या अंनत ॥
देह असूनी ज्याची दशा , वर्ते देहातीत ।
त्या ज्ञानीच्या श्रीचरणी , नमस्कार अगणित ॥
गुरू देव गुरू देवता , गुरू विना घोर अंधार ।
जे गुरूवाणीस दुरावले , दुखावले जगी फार ॥
परम पुरुष प्रभू सदगुरू , परमज्ञान सुखधाम ।
ज्यांनी करविले ज्ञान निज , त्यांना सदा प्रणाम ॥
॥ हरि ओम ॥