श्रीआसारामायण (मराठी)
गुरू ब्रम्ह दोन्ही समसमान , हे ही उपमा किंचित न्यून
गुरूवाक्यें ब्रम्हा ब्रम्हपण , तो सदगुरु पूर्ण अद्वयत्वे
ब्रम्ह सर्वांचे प्रकाशक , सदगुरू तयाचाही प्रकाशक
एवं गुरूहुनी अधिक , नाही आणिक पूज्यत्वें ॥
त्या सदगुरूचे देखिल्या पाये , तहान भूख तात्काळ जाये
कल्पना उठोचि न लाहे , निजसुख आहे गुरूचरणी ॥
सदगुरू सर्वांग सुंदरू , सकळ विद्यांचा आगरू ।
त्यासी माझा नमस्कारू , साष्टांग भावे ॥

 

               श्रीआसारामायण


गुरू चरण रज शीष धरी , हृदय रूप विचार ।
श्रीआसारामायण वदे , वेदांताचा सार ॥
धर्म कामार्थ मोक्ष देई , रोग शोक संहार
भजे जो भक्तीभावाने , त्वरित होई बेडा पार ॥

 

भारतभूच्या सिंधुकिनारी , नवाब जिल्ह्यात गाव बेराणी ।
राहत असे एक शेठ सदगुणी , नाव थाऊमल सिरूमलानी ॥
आज्ञेत राही पत्नी महेंगीबा , पतीपरायण नांव मंगीबा ।
चैत्र वद्य एकोणीसशे अठ्ठ्याणवाला , आसुमल अवतरले षष्ठीला ॥
मातृमनी उसळे सुख सागर , द्वारी आला एक सौदागर ।
आणला एक अति सुंदर पाळणा , पाहूनी पिता मनी हर्षला ॥
सर्व चकीत ईश्वराची माया, योग्य वेळी कसा हा आला ।
ईश्वराची ही लीला न्यारी , बालक हा कोणी चमत्कारी ॥


संत सेवा आणि श्रुति श्रवण , माता पिता उपकारी ।
धर्म पुरुष जन्मला कोणी , पुण्यांचे फळ भारी ॥


चेहरेपट्टी बाळाची सवाई , जन्मताच केली अशी नवलाई ।
समाजात होती मान्यता जैसी , प्रचलित एक लोकोक्ती ऐसी ॥
तीन बहिणींच्या पाठी जो येतो . पुत्र तो त्रेखण म्हणवितो ।
निपजे अशुभ अमंगलकारी , दरिद्रता आणितो हा भारी ॥
उलट परिस्थिती दिसुनी आली , घरात जणू काही लक्ष्मी आली ।
इंद्रदेवाचे आसन डोलले , कुबेराने भांडार उघडले ।
मान-प्रतिष्ठा खूप वाढली , सकल मनी सुख-शांती आली ॥


तेजोमय बालक वाढला , आनंद झाला अपार ।
शील शांतीचे आत्मघन , करू लागले विस्तार ॥


एके दिनी त्यांच्या आली द्वारी , कुलगुरू परशुरामाची स्वारी ।
जेव्हा त्यांनी बाळास पाहिले , पाहूनी ते सहज बोलले ॥
हा नसे बालक साधारण, दैवी लक्षण तेज आहे कारण ।
नेत्रांमध्ये  सात्विक लक्षण , याची कार्ये मोठी विलक्षण ॥
हा तर मोठा संत होईल, लोकांचा उद्धार करील ।
ऐकूनी गुरूची भविष्यवाणी , गदगद झाले सिरूमलानी ।
आईनेही कपाळ चुंबिले , प्रत्येकाने बाळास फिरविले ॥


ज्ञानी वैरागी पूर्वीचा , तुझ्या घरी अवतरला ।
जन्म घेतला योगीने , पुत्र तुझा म्हणविला ॥
पावन झाले कुळ तुझे , जननी कूस कृतार्थ
नांव अमर झाले तुझे , पूर्ण चार पुरुषार्थ ॥


सत्तेचळिस साली देश विभाजन , सिंधमध्ये सोडले भू-पशू व धन ।
भारतात अहमदाबादला आले, मणिनगरला शिक्षण घेतले ॥
अति विलक्षण स्मरणशक्ती , आसुमलची त्वरित युक्ती ।
तीव्र बुद्धी एकाग्र नम्रता , त्वरित कार्य अन सहनशीलता ॥
आसुमल प्रसन्नमुख राहती , शिक्षक हसमुखभाई म्हणती ।
पिस्ता बदाम काजू अखरोट , खिसे भरून खाती भरपोट ॥
देऊनी खाऊ लोणी खडीसाखरेचा , आईने शिकविले ध्यान व पूजा ।
ध्यानाचा स्वाद लागला तैसा , राहिना मासा पाण्याविण जैसा ॥
झाले ब्रम्हविद्येने युक्त ते , तिच विद्या जी विमुक्त करीतसे ।
रात्रभर ते पाय चेपायचे , तृप्त पित्याचे आशिर्वाद घ्यायचे

 

बाळा तुझे रे या जगती , सदैव राहील नांव
लोकांचे तुझ्याकडून सदा पूर्ण होईल काम ॥

 

पित्याचे छत्र हरपले जेव्हा , टाकले मायेने जाळे तेव्हा ।
मोठ्या भावाचे झाले दुःशासन , व्यर्थ्य झाले आईचे आश्वासन
सुटले वैभव शाळा शिक्षण , सुरु झाले मग अग्नी परिक्षण ।
सिध्दपुरला ते नोकरीस गेले , कृष्णापुढे अश्रू ढाळले ॥
सेवक सखा भावाने भिजले, गोविंद माधव तेव्हा रिझले ।
एके दिनी एक बाई आली , म्हणाली हे भगवान सुखदाई ॥
पुत्र तुरूंगात बहु मी दुखावले , खून खटल्यात दोन फसली मुले ।
म्हणे आसुमल सुखी राहतील , निर्दोष सुटून लवकर येतील ।
मुले घरी आली आई निघाली , आसुमलच्या पाया पडली ॥

 

आसुमलचा पुष्ट झाला , अलौकिक प्रभाव ।
वाकसिध्दिच्या शक्तीचा , झाला प्रादुर्भाव ॥

 

वर्ष सिद्धपुरी काढली तीन , अहमदाबादला आले परतून
करू लागली लक्ष्मी नर्तन , केले भावाचे मन परिवर्तन ॥
दारिद्र्याला दूर सारले  , वैभवाने घर भरुन दिले ।
सिनेमा त्यांना  कधी न आवडे , जबरीने नेले नी रडत आले ॥
ज्या आईने ध्यान शिकविले , तिलाच आता रडू कोसळले ।
आईची इच्छा करावे लग्न , आसुमलचे वैरागी मन ॥
तरीही सर्वांनी आग्रह केला , वाङनिश्चय जबरीने केला ।
लग्नास तयार झाले सर्वजण , आसुमलने केले पलायन ॥

 

पंडीत म्हणे गुरू समर्थांना , रामदास सावधान ।
सप्तपदी फिरतांना , पळाले वाचवून प्राण ॥

 

शोध घेऊनी सर्वच थकले , अशोक आश्रमात भडोचला मिळाले
मार्ग मिळाला मुश्किलीने , अब्रूची आण दिली भावाने ॥
युक्ती प्रयुक्तीने घरी आणले , वरात घेऊन आदिपुरला गेले ।
लग्न झाले पण  घट्ट मन केले , भक्ताने पत्नीला समजाविले ॥
आपले वागणे राहील ऐसे , पाण्यात कमळ राहते जैसे ।
सांसारीक व्यवहार तेव्हा होईल , जेव्हा मला साक्षात्कार होईल ।
सोबत राही जसे आत्मा काया , सोबत राहिले वैरागी माया ॥

 

अनश्वर मी जाणतो , सतचित हो आनंद ।
स्थितीत जगू लागता , होई परमानन्द ॥

 

मूळ ग्रंथ अभ्यासा हेतू , संस्कृत भाषा आहे एक सेतू
संस्कृत भाषा  शिकून घेतली , गती आणि साधना वाढविली ॥
एक श्लोकास हृदयात ठसविले , निद्रीत वैराग्य जागे झाले ।
आशा सोडून नैराश्य अवलंबिले , अनुष्ठान त्यांनी आरंभिले ॥
लक्ष्मी देवीस समजाविले , ईश्वर प्राप्ती ध्येय सांगितले ।
घर सोडून निघून जाईन , ध्येय मिळवूनी परत येईन ॥
केदारनाथाचे दर्शन घेतले , लखोपतीभव आशिष घेतले ।
मनोभवे पुन्हा संकल्प केला , ईश प्राप्तीचा आशिष घेतला ॥
आले कृष्णाच्या लीलास्थळीत , वृंदावनीच्या कुंज गलीत ।
कृष्णाने मनात असे प्रेरिले , नैनीतालच्या ते वनात गेले ॥
तेथे श्रोत्रिय ब्रम्हनिष्ठित , स्वामी लीलाशाह प्रतिष्ठित ।
आत मृदू अन बाहेर कठोर , निर्विकल्प जणू कागद कोरा ।
पूर्ण स्वतंत्र परम उपकारी , ब्रम्हस्थित आत्मसाक्षात्कारी ॥

 

ईश कृपेविण गुरू नाही , गुरूविण नाही ज्ञान ।
ज्ञानविण आत्मा नाही , गाती वेद पुराण ॥

 

जाणण्यास साधकाची कोटी , सत्तर दिवस झाली कसोटी ।
अग्नीत सोने तप्त बनवीले , गुरूंनी आसुमल बोलाविले ॥
म्हणे गृहस्थ होऊन कर्म करा , ध्यान भजन ही घरीच करा ।
आज्ञा पाळुन घरी आले , पक्षात मोटी कोरलला गेले ॥
नर्मदेकाठी ध्यानास बसले , लालजी महाराज आकर्षिले ।
प्रेमळ स्वामी तेथे आले , दत्तकुटीमध्ये साग्रह नेले ॥
भरते आले प्रभु प्रेमाचे , अनुष्ठान चाळीस दिवसांचे ।
मेले षडरिपु स्थिति मिळाली , ब्रम्हनिष्ठता सहज लाभली ॥
शुभाशुभ सम रुदन गायन , ग्रिष्म थंडी अन मानापमान ।
सदा तृप्ती काय भूक पिपासा, महाल झोपडी आशानिराशा ।
भक्तीयोग ज्ञान अभ्यासी , झाले समान मगहर अन काशी ॥

 

भावच कारण ईश्वरास , न स्वर्ण काष्ठ पाषाण ।
सत चित आनंदरूप आहे , व्यापक रे भगवान ॥
ब्रम्हेशान जनार्दन , शारदा शेष गणेश ।
निराकार साकार रे , आहे सर्वत्र भवेश ॥

 

झाले आसुमल ब्रम्हाभ्यासी , जन्म अनेक आले फळासी ।
दूर पळाली आधी-व्याधी , सिद्ध जाहली सहज समाधी ॥
एके रात्री नदीकाठी मन आकर्षले , सुटले वादळ मेघ वर्षले ।
बंद घराची ओसरी पाहिली , बसले तिथेच समाधी लावली ॥
पाहिले कुणीतरी वाटले डाकू , आणल्या काठ्या भाले चाकू ।
पळापळ-गोंधळ करू लागले , तुटली समाधी ध्यान भंगले ॥
साधक उठला होते विखुरले केस , क्रोधाचा नव्हता लवलेश ।
सरळ लोकांनी साधू मानले , हत्यार्‍यांनी काळच जाणले ॥
भैरव पाहुन दुष्ट घाबरले , पहिलवानांना मल्लच दिसले ।
कामी लोकांनी प्रियकर मानले, साधूजनांनी वंदन केले ॥

 

समद्रुष्टीने पाही सर्वांना , चालही शांत गंभीर ।

सशस्र गर्दीला सहज चिरुन गेले पीर ॥

 

आई आली धर्मात्मा देवी , बरोबर पत्नी लक्ष्मी देवी ।

दोघींनाही रडू कोसळले , करूणेनेही अश्रू ढाळले ॥

संत लालजींचे हृदय द्रवले , दर्शकही अश्रूंमध्ये भिजले ।

सर्व म्हणाले तुम्ही घरी जा, म्हणे आसुमल तुम्ही ऐका ॥

चाळीस दिवस झाले नाही पूर्ण , अनुष्ठान आहे माझे अपूर्ण ।

आसुमलने सोडली तितिक्षा , आई व पत्नीने केली प्रतीक्षा 

ज्या दिवशी गाव त्यांनी सोडले , गांवचे नर-नारी खूप रडले ।

अहमदाबादला केले प्रयाण , मियागावातून केले पलायन ॥

मुंबईला गेले गुरुंची चाह , भेटले तेथे लीलाशाह ।

परमपित्याने पुत्रास पहिले , सुर्याने घटजलात पाहिले ॥

घडा तोडून जल जलात मिळविले , जलप्रकाशाने आकाश उजळले ।

निज स्वरूपाचे ज्ञान दृढावले , अडीच दिवस समाधीत रंगले ॥

 

आश्विन शुध्द द्वितीया , संवत वीसशे एकवीस ।

मध्यान्ही अडीच वाजता , भेटला ईशला ईश ॥

देह सर्व मिथ्या झाला , जगत झाले निस्सार ।

झाला आत्म्याशी तेव्हा , आपला साक्षात्कार ॥

 

परम स्वतंत्र पुरुष प्रगटला , जीवत्व जाऊन शिवत्वी मिळाला ।

जाणले आहे मी शांत निरंजन , मला न लागू कुठले बंधन ॥

हे जगत आहे सारे नश्वर , मीच आहे शाश्वत एक अनश्वर ।

नेत्र दोन परि दृष्टी एक आहे , लघु गुरु मध्ये तोच एक आहे ॥

सर्वत्र एक कुणाला सांगावे , सर्व व्याप्त कुठे यावे जावे ।

अनंत शक्तीपुंज अविनाशी , रिध्दी सिध्दी त्याच्या दासी ॥

साराच ब्रम्हांड पसारा , चाले त्याच्या इच्छानुसारा ।

जर तो स्वत: संकल्प चाल्वी , मृत कायाही जीवंत होई ॥

 

ब्राम्ही स्थिती प्राप्त होता कार्य न राही शेष ।

मोह कधी ना फसवू शके , इच्छा नाही लवलेश ॥

पूर्ण मिळविली गुरुकृपा , पूर्ण गुरुचे ज्ञान ।

आसुमलातून प्रगटले , सांई आसाराम ॥

 

जागृत स्वप्नी सुषुप्ती चेती , ब्रम्हानंदाचा घेती ।

खाता पीता मौन वा बोलता , ब्रम्हानंद मस्तीत राहता ॥

रहा घरीच गुरुंचा हा आदेश , गृहस्थ साधू करा उपदेश ।

गुरुंनी आगळी किमया केली , गुजरात डीसा स्वारी आली ।

मृत गाईस जीवनदान दिले , तेव्हापासून लोकांनी ओळखले ॥

द्वारी म्हणती नारायण हरी , घेण्या जाती कधी माधुकरी ।

तेव्हा पासून ते सत्संग देती , सर्व आरतीने शांती मिळविती ॥

जो आला त्याचा उध्दार केला , बेडा पार भक्तांचा केला ।

कित्येक मरणासन्न वाचविले , व्यसन मांस अन मद्य सोडविले ॥

 

एके दिवशी मन उबगले , प्रयाण केले डीसाहून ।

आली लहर फकीराची , झोपडी दिली झुगारुन ॥

 

ते नारेश्वर धामी आले, नर्मदा नदीच्या काठी गेले ।

मंदिर मागे दूर टाकले , घनदाट जंगलामध्ये गेले ॥

एक वृक्षाखाली दगडावरती , बसूनी ध्यान निरंजन धरती ।

रात्र सरली सकाळ झाली , बाल सुर्याने छबी दाखवली ॥

पहाटे कोकीळेचे मंजूळ गायन , उठले संत सुटल्यावर ध्यान ।

प्रातर्विधी करून घेतला , तेव्हा आभास भुकेचा झाला ॥

विचार केला मी न जाणार कोठे , आता राहिन मी बसून येथे ।

ज्याला गरज असेल तो येईल , सृष्टीकर्ताच भोजन आणिल ॥

जसा त्यांच्या मनी आला विचार , दोन शेतकरी झाले हजर ।

फेटा दोघांच्या डोक्यावरती , खाद्यपेय दोन्ही हाती ॥

म्हणे सफल झाले जीवन आज , अर्घ्य स्विकारा महाराज ।

म्हणे  संत दुसरीकडे जावे , असेल जो तुमचा त्याला द्यावे ॥

म्हणे शेतकरी आपण दिसला , स्वप्नात मार्ग रात्री पाहिला ।

आमुचा ना कोणी संत दुजा , चला गावी करू तुमची पूजा ॥

आसारामांनी मनी ठरविले , निराकार आधार आपुले ।

प्याले दूध थोडे फळ खाल्ले , नदीकिनारी योगी आले ॥

 

गांधीनगर गुजरातमध्ये आहे मोटेरा ग्राम ।

ब्रम्हनिष्ठ श्री संताचे , हेच आहे पावन धाम ॥

आत्मानंदात मग्न आहेत करती वेदांती खेळ ।

भक्ती योग अन ज्ञानाचा सदगुरू करती मेळ ॥

साधिकांचा आहे वेगळा , आश्रम नारी उत्थान ।

नारी शक्ती जागृत सदा , गाती सारे गुणगान ॥

 

बालक वृध्द आणि नरनारी , सर्व प्रेरणा मिळविती भारी ।

एकदा जरी कोणी दर्शन घेई , शांतीचा त्याला अनुभव येई ॥

नित्य विविध प्रयोग करविती , नादानुसंधान सांगती ।

नाभीतून ते ओम म्हणविती , हृदयातून ते राम म्हणविती ॥

सामान्य जे ध्यान करिती , त्यांना अंतर्यात्रा करविती ।

सकला निर्भय योग शिकविती , सर्वांचे आत्मोत्थान करविती ॥

हजारोंचे रोग मिटविती , अन लाखोंचे शोक मिटविती ।

अमृतमय प्रसाद जेव्हा देती , भक्तांचा रोग शोक ते हरती ॥

ज्यांनी नामाचे दान घेतले , गुरू अमृतही प्राशन केले ।

त्यांचा योग क्षेम ते वाहती , ते न तीन तापांनी तपती ॥

धर्म कामार्थ मोक्ष मिळविती , रोग संकटातून ते वाचती ।

सर्व शिष्यांचे रक्षण करतात , सुक्ष्म देहाने सदगुरू येतात ॥

दयाळू आहेत सदगुरू खरोखर , सहज तारी सर्वांना बरोबर ।

ते इच्छिती गुरू-अमृत लुटावे , सर्वांनी आत्मज्ञान मिळवावे ॥

एकशे आठ जे पाठ करतील , त्यांची सर्वही कामे होतील ।

काशीकर नावाचा दास , पुर्ण होईल सर्व आस ॥

 

वराभयदाता सदगुरू ,परमही भक्त कृपाळू ।

निश्चल प्रेमाने जो भजे , सांई करती निहाल ॥

मनात तुमचे नाम राहो , मुखी राहो सुगीत ।

आम्हांस इतके द्या तुम्ही , चरणी राहू द्या प्रीत ॥

 

                 श्रीगुरू-महिमा

 

गुरूविना ज्ञान न उपजे , गुरू विना मिटे न भेद ।

गुरू विना संशय न मिटे , जय जय जय गुरूदेव ॥

 

तीर्थाटनाचे एक फळ , संत भेटी फळ चार ।

सदगुरू भेटी अनंत फळ , म्हणे कबीर विचार ॥

 

भव भ्रमण संसार दु:ख , त्याचा अंत ना आदी ।

निर्लोभी सदगुरू विना कोण तारे भव व्याधी ॥

 

पूर्ण सदगुरू सेविता अंतर प्रगटे आप ।

मनसा वाचा कर्मणा , मिटती जन्मांचे ताप ॥

 

समदृष्टी सदगुरूने केली , मिटला भ्रमाचा विकार ।

जेथे पाहो तेथे एकच , प्रभुचा साक्षात्कार ॥

 

आत्मभ्रांती सम रोग नाही , सदगुरू वैद्य सुजाण ।

गुरू आज्ञेसम पथ्य नाही , औषध विचार ध्यान ॥

 

सदगुरू पदी समाविष्ट आहेत , अरिहंतादी पद सर्व ।

अशा सदगुरू श्रीचरणी , त्यजूनी उपासा गर्व ॥

 

दिव्य दृष्टी विना मिळत नाही , परमात्म्याची साथ ।

सेवे सदगुरूचे चरण , तो पावे साक्षात ॥

 

जे स्वरूप जाणल्याविना दु:ख पावलो अनंत ।

समजाविणार्‍या सदगुरूंना वंदन करू या अंनत ॥

 

देह असूनी ज्याची दशा , वर्ते देहातीत ।

त्या ज्ञानीच्या श्रीचरणी , नमस्कार अगणित ॥

 

गुरू देव गुरू देवता , गुरू विना घोर अंधार ।

जे गुरूवाणीस दुरावले , दुखावले जगी फार ॥

 

परम पुरुष प्रभू सदगुरू , परमज्ञान सुखधाम ।

ज्यांनी करविले ज्ञान निज , त्यांना सदा प्रणाम ॥

 

 

               ॥ हरि ओम ॥